Schedule : Monday - Saturday : 10 AM to 8 PM IST | Online Consultation
होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण. याकरिता वापरल्या जाणार्या रंगांमध्ये असणारे रासायनिक पदार्थ त्यामुळे त्वचेवर होणारे गंभीर परिणाम टाळायचे असल्यास प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर डाग पडणे,लालसरपणा आदीचा सामना करावा लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपण रंगांनी खेळू शकत नाही आणि या उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाही. तर त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आपल्याला होळी खेळण्यापुर्वी आणि खेळल्यानंतर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीसाठी त्वचेची काळजी घेणे खरोखरच सोपे आहे त्यासाठी आपण काय करू शकता याविषयी द एस्थेटिक क्लिनिकचे सल्लागार त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी अधिक माहिती दिली आहे.
होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी
होळी खेळल्यानंतर काय काळजी घ्याल?
होळीनंतर रंगांच्या परिणामापासून मुक्त होण्यासाठी चांगल्या दर्जाचे तसेच घरच्या घरी तयार केलेले फेस पॅक वापरा:
बदाम आणि मध यांचा फेसपॅक : मध आणि सोबत काही भिजवलेले बदाम, लिंबाचा रस आणि २ चमचे दूध घाला. ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि ते कोरडे होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे पॅक त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि सुरकुत्या येण्यास प्रतिबंध करते. .
बेसन आणि दही : थोडा बेसन, दही २ थेंब गुलाबाच्या पाण्यासोबत चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण त्वचेवर लावा आणि २० मिनीटानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे पॅक त्वचेला कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.
मसूर डाळ आणि संत्र्याची साल: एक चमचा मसूर डाळ, एक चमचा वाळलेल्या संत्राची साल, एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि २ थेंब लिंबाचा रस मिसळा. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. हा पॅक सुकल्यावर हाताला थोडेसे पाणी लावा आणि फेस पॅक हलक्या हाताने काढून टाका. हे पॅक त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवेल तसेच त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकेल आणि त्वचा गुळगुळीत होण्यास मदत करेल.
लिंबू आणि कोरफड: लिंबाच्या रसाच्या कोरफडचा गर एकत्र करून हे मिश्रण कापसाच्या सहाय्याने आपल्या चेह-यावर लावावे. हा पॅक टॅन काढून टाकण्यास मदत करेल, चेह-यावरील डागांवर प्रभावी ठरेल.
Article Source - http://enavakal.com/how-to-take-care-from-color/
Dr. Debraj Shome is Director and Co founder of The Esthetic Clinics. He has been rated amongst the top surgeons in India by multiple agencies. The Esthetic Clinics patients include many international and national celebrities who prefer to opt for facial cosmetic surgery and facial plastic surgery in Mumbai because The Esthetic Clinics has its headquarters there.